मुख्य सामग्रीवर वगळा

महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी 'अरण्येर अधिकार' कादंबरी

         

          जेमतेम २५ वर्षांचे आयुष्य लाभलेले धरतीआबा बिरसा मुंडा हे नाव आदिवासी नव्हे तर समस्त भारतात एक लढवय्या क्रांतिकारक म्हणून आदराने घेतले जाते.   १८९०च्या दशकात जेव्हा संपूर्ण देश इंग्रज अमलाखाली होता आणि मेकालेचे शिक्षण घेऊन पांढरपेशी वर्ग गोऱ्या साहेबांची चाकरी करत होता त्या काळात बिरसा मुंडा छोटा यांनी नागपूर परिसरात 'आबुआ: दिशोम रे अबुआ: राज' अशी गर्जना करत साम्राज्यवादी राजवटी विरोधात संघर्ष पुकारला.  बिरसा मुंडा यांचं नाव घेतलं की उलगुलान हा शब्द आपोआप ओठी येतो. उलगुलान म्हणजे 'सर्व क्षेत्रात एकाच वेळी केलेला उठाव, क्रांती' धरती आबा बिरसा मुंडा यांनी उलगुलानद्वारे समाजिक, वैचारिक, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीला झुगारून आदिवासी जनसमूहांनी लढण्यास सज्ज राहण्याचा संदेश दिला.  बिरसा मुंडा यांनी जल-जंगल-जमीन अशा सर्व नैसर्गिक संसाधनावर आदिवासींच्या पारंपरिक, सामूहिक हक्काचे संरक्षण केले. निसर्गाला ओरबाडणारी नफा केंद्रित भांडवली व्यवस्था नाकारली. धरती आबा बिरसा मुंडा 'मरण पत्करेन पण शरण जाणार नाही' या बाण्याने लढले.  बिरसाने आदिवासी समाजाला आपल्या न्याय्य हक्कासाठी मारायला शिकवले त्यातूनच आदिवासी जगणं हे अधिक प्रखर केलं. 
         आदिवासींच्या लढ्याचा हा इतिहास तथाकथित मुख्यधारेने कायम अनुल्लेखाने मारला आहे. परंतु चळवळीने आदिवासींचा हा इतिहास लुप्त होऊ दिलेला नाही.  त्यामुळेच महाश्वेतादेवी या संवेदनशील लेखिकेने बिरसा मुंडाच्या जीवनावर जेव्हा 'अरण्येर अधिकार' ही कादंबरी लिहिली तेव्हा तिचे स्वागत झाले आणि अनेक भाषांमध्ये भाषांतरीत होत ती घराघरात पोहोचली. महाश्वेतादेवी यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या बिरसा ह्या क्रांतिकारक नेत्याचे चरित्र अत्यंत सहृदयतेने आपल्यासमोर मांडले आहे. 'अरण्येर अधिकार' या कादंबरीचा नायक 'बिरसा मुंडा' हा इंग्रज आणि त्यांचे सहाय्यक झालेल्या जमीनदार लोकांविरुद्ध विद्रोहाची ठिणगी पेटवितो, शोषणाच्या विरुद्ध जनमानस संघटीत करतो आणि त्यासाठी आपले मात्र पंचवीसाव्या वर्षी बलिदान देतो. 
              मराठीत  प्रभा तुळपुळे यांनी ही कादंबरी भाषांतरीत केली. मराठी साहित्याच्या दालनात त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
'अरण्येर अधिकार' ही कादंबरी आता मराठी वाचकांसाठी नव्या स्वरूपात उपलब्ध होत आहे ही अत्यंत अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे.  शंभर सव्वाशे वर्षानंतरही बिरसा मुंडा यांचे विचार, कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. आज आदिवासींचे अस्तित्व संकटात आहे. आदिवासींचे जंगल संपत चालले आहे. आदिवासींची समतामूलक संस्कृती, आदिवासींच्या सामूहिक परंपरा आता लोप पावत आहेत. भांडवलशाही पर्यावरणीय संकट निर्माण करून सृष्टी नष्ट करण्याच्या दिशेने जात असताना सर्व मानव समाजाला आदिवासींच्या मूळ निसर्गकेंद्रित जीवन पध्दतीला स्वीकारावे लागेल. तर आणि तरच आपण सर्व जगू.   धरती आबा बिरसा मुंडा यांचे संघर्षमय जीवन पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

 - काळूराम का. धोदडे, संस्थापक : भूमिसेना, आदिवासी एकता परिषद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी

मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी                    आजच्या घडीला शिक्षणाची डिग्री केवळ कागद ठरत असताना फक्त पारंपरिक शिकून उपयोग नाही. काळ बदलत आहे. एक काळ असाही होता की,   केवळ डी.एड./बी.एड. केले तरी सहज शिक्षक होता येत   असे आणि दहावी/बारावी पास झाले की, किमान मिलिटरीत / पोलिसात भरती होता येत असे. आज मात्र सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अगदी नेट/सेट/पीएच.डी. केली तरी नोकरी मिळत नाही. काही उच्च विद्याविभूषित तरुण वेठबिगारीची कामे करताना दिसून येतात, तर काही सीएचबीवर नोकरी करून पाच-सात हजारांत घर-संसार चालवण्याच्या फुटकळ प्रयत्न करताना दिसतात. डी.एड./बी.एड., नेट/सेट/पीएच.डी. करूनही आज नोकरी मिळविण्यासाठी पस्तीस ते पन्नास लाख रुपये डोनेशन भरावे लागते, हे काळे सत्य नाकारून चालणार नाही. एकीकडे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो   पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे छाती ठोकून सांगणारा आपला समाज शिक्षणामुळेच जीवनलढा हरतोय की काय, अशी शंका निर्माण होत आहे. साधी गोष्ट आहे साधा वडापाव विकणारा आपली मुले लाखभर डोनेश...

भाषा आणि वर्तमानातील व्यावसायिक संधी

           भाषा ही संवादाची एक प्रभावी साधन आहे , जी मानवी समाजाची अभिव्यक्ती आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे . भाषा फक्त संवाद करण्यासाठीच नाही , तर ती व्यक्तीच्या वैचारिक क्षमतेला धार देण्यासाठी आणि समाजातील विविध स्तरांशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असते . विशेषतः   आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात   भाषा केवळ सांस्कृतिक ओळख बनून राहिलेली नाही , तर ती एक व्यावसायिक संधीदेखील बनली आहे . आज   भाषा आणि व्यावसायिक संधी यांचे परस्पर संबंध वाढत चालले आहेत आणि अनेक नवीन क्षेत्रे उभी राहिली आहेत , ज्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत .         आजच्या वाणिज्यिक , शैक्षणिक   आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भाषा शिकण्याचे महत्त्व प्रचंड वाढले आहे . व्यवसाय , उद्योग   आणि सेवाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकापेक्षा अधिक   भाषांचे  ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे . जर एखाद्या व्यक्तीला बहुभाषिक कौशल्य असेल , तर त्याला जागतिक स्तरावर व्यावसायिक संधी मिळवणे खूप सोपे जाते ....

प्राध्यापक भरतीची व्यथा

                  डॉ.पाटील /लातूर' या नावाने  मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असलेल्या मित्राचा आज फोन आला होता.  तो सांगत होता, "सर, प्राध्यापक भरती MPSC द्वारे होण्यासाठी काय करावे सुचत नाही, संस्थाचालक 50 लाख रुपये मागतायेत जॉयनिंगसाठी, शेतही जास्त नाही विकून म्हडे शिकले असते त्यांचे.  नोकरी नाही म्हणून लग्नही जमेना. मायच्यान  सांगतो सर, 41 वर्षे वय आहे माझे,   शेकड्यांनी मुली पाहिल्या ; पण कुणी होकार दिला नाही. चार पोते तरी पोहे खाऊ घातले असतील आलेल्या पाहुण्यांना , आणि साड्यांचे तर विचारूच नका ; दुकानदार केस करायला निघाला होता उधारीसाठी, पण आईने मंगळसूत्र आणि घरातलं किडुकमिडुक विकून थोडी उधारी मिटवली, तव्हा गप्प बसला दुकानदार, पण देणं आहेच त्याचं. " मी सहज विचारले विषय कोणता आहे तुमचा आणि CHB का करत नाहीत मग एखाद्या कॉलेजवर? डॉ. सांगू लागले, "ऑक्सफर्ड शिकून आलेल्या प्राध्यापकाकडे अर्थशास्त्र पीच.डी.झाली माझी. आणि केली सर CHB 4-5 कॉलेजवर. सुरुवातीला काही ठिकाणी फुकट शिकवले आणि नंतर काही ठिकाणी पगारावर जॉईन झालो त...