मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भाषा आणि वर्तमानातील व्यावसायिक संधी

           भाषा ही संवादाची एक प्रभावी साधन आहे , जी मानवी समाजाची अभिव्यक्ती आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे . भाषा फक्त संवाद करण्यासाठीच नाही , तर ती व्यक्तीच्या वैचारिक क्षमतेला धार देण्यासाठी आणि समाजातील विविध स्तरांशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असते . विशेषतः   आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात   भाषा केवळ सांस्कृतिक ओळख बनून राहिलेली नाही , तर ती एक व्यावसायिक संधीदेखील बनली आहे . आज   भाषा आणि व्यावसायिक संधी यांचे परस्पर संबंध वाढत चालले आहेत आणि अनेक नवीन क्षेत्रे उभी राहिली आहेत , ज्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत .         आजच्या वाणिज्यिक , शैक्षणिक   आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भाषा शिकण्याचे महत्त्व प्रचंड वाढले आहे . व्यवसाय , उद्योग   आणि सेवाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकापेक्षा अधिक   भाषांचे  ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे . जर एखाद्या व्यक्तीला बहुभाषिक कौशल्य असेल , तर त्याला जागतिक स्तरावर व्यावसायिक संधी मिळवणे खूप सोपे जाते ....
अलीकडील पोस्ट

प्रा. दिलीप महालिंगे नावाचा पाऊस

 प्रा. दिलीप महालिंगे नावाचा पाऊस                     मराठवाड्यातील वर्तमान शिक्षण पद्धत पाहिली असता अशी अनेक कला  महाविद्यालये आहेत, जिथे तीन वर्षांची पदवी पूर्ण झाली तरी  शिक्षक आणि विद्यार्थी यांची ओळख होत नाही. लाखो रुपये डोनेशन देऊन विकत घेतलेली नोकरी करताना असे नेहमीच घडते. बदलत्या काळासोबत कला शाखेपासूनच्या आशा-अपेक्षा संपत असल्याने सर्वत्रच शिक्षणाची उपेक्षा होताना दिसत आहे. महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत दोन वेळा थम करणे आणि नोकरी मिळवण्यासाठी भरलेल्या रकमेची वसुली कोणत्या मार्गाने होईल, याचाच पाठपुरावा करताना अनेक प्राध्यापक मित्र दिसून येतात. याचाच परिणाम म्हणून जसे एखादे दैनिक उघडले की, ‘अपघात’, ‘पतीकडून पैशासाठी छळ’, ‘दुकानात जाते म्हणून गेली अन परत आलीच नाही’ अशा बातम्या वाचायायला मिळतात.  त्यासोबत ‘थेसिस सबमिशनसाठी ५० हजारांची मागणी’, ‘पीएच.डी. व्हायवासाठी मागितले दीड लाख’, ‘विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी’ यासारख्याही बातम्या नेहमीची येत असतात. अशा काळात एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असता...

महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी 'अरण्येर अधिकार' कादंबरी

                    जेमतेम २५ वर्षांचे आयुष्य लाभलेले धरतीआबा बिरसा मुंडा हे नाव आदिवासी नव्हे तर समस्त भारतात एक लढवय्या क्रांतिकारक म्हणून आदराने घेतले जाते.   १८९०च्या दशकात जेव्हा संपूर्ण देश इंग्रज अमलाखाली होता आणि मेकालेचे शिक्षण घेऊन पांढरपेशी वर्ग गोऱ्या साहेबांची चाकरी करत होता त्या काळात बिरसा मुंडा छोटा यांनी नागपूर परिसरात 'आबुआ: दिशोम रे अबुआ: राज' अशी गर्जना करत साम्राज्यवादी राजवटी विरोधात संघर्ष पुकारला.  बिरसा मुंडा यांचं नाव घेतलं की उलगुलान हा शब्द आपोआप ओठी येतो. उलगुलान म्हणजे 'सर्व क्षेत्रात एकाच वेळी केलेला उठाव, क्रांती' धरती आबा बिरसा मुंडा यांनी उलगुलानद्वारे समाजिक, वैचारिक, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीला झुगारून आदिवासी जनसमूहांनी लढण्यास सज्ज राहण्याचा संदेश दिला.  बिरसा मुंडा यांनी जल-जंगल-जमीन अशा सर्व नैसर्गिक संसाधनावर आदिवासींच्या पारंपरिक, सामूहिक हक्काचे संरक्षण केले. निसर्गाला ओरबाडणारी नफा केंद्रित भांडवली व्यवस्था नाकारली. धरती आबा बिरसा मुंडा 'मरण पत्करेन पण शरण जाणार ...

पगडी शब्दाचा हा अर्थ माहिती आहे का ?

            कोणत्याही भाषेत अनेकार्थी शब्द असतात जसे की ‘कर’ या मराठी शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक ‘हे कर ....ते कर’ मधील करावे याअर्थी वापरला जाणारा शब्द आणि दुसरा ‘कर’ म्हणजे ‘हात’ होय. त्याचप्रमाणे ओढा याशब्दाला ‘पाण्याचा प्रवाह’ आणि ‘कल’ हे दोन अर्थ आहेत. याचप्रमाणे कळ (वेदना, भांडणाचे कारण), खोड (झाडाचा बुंधा, सवय) हे शब्दही अनेकार्थी आहेत. आज मी ज्या पगडी शब्दाचा अर्थ सांगणार आहे, तो नक्कीच तुम्ही नव्याने जाणून घेत असाल. पगडी डोक्यात घालायची असते आणि ती विविध प्रकारची असते हे आपणास माहिती आहे. उदा. नवरदेवाची पगडी, पेशवाई पगडी, महात्मा फुले वापरत ती फुले पगडी, त्याच प्रमाणे शेतकऱ्याची पगडी आपण पाहिलेली आहे.             पगडी हा स्रीलिंगी शब्द आहे. साधारणपणे पुरुषांच्या डोक्यावर बांधलेले पागोटे म्हणजे पगडी, असे आपणास माहिती आहे.एकूणच पुरुषांचे शिरोभूषण म्हणजे पगडी होय. यामुळेच ‘शिर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण प्रचारात आली. मात्र, याच पगडी शब्दाला मुंबई परिसरात वेगळ्या अर्थाने वापरतात. तिथे पगडी म्हणजे ‘जागा भाड्याने देणे अथवा...

असा लुटला जातोय सेट/नेट पात्रताधारक

    आज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन कित्येक वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य  तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते. दुष्काळछायेतील या विभागात प्रत्येक ३ दिवसाला १ शेतकरी  आत्महत्या करताना दिसून येत आहे. यंदाही सर्व खरीप हंगाम करपलेला दिसून येतो.  मात्र, महाराष्ट्र शासनाला याचे सोयरसुतक असल्याचे जाणवत नाही. यामुळे येथील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.       मराठवाड्यात जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, विष्णुपुरी आणि  येलदरी एवढीच महत्वाची धरणे आहेत. यातील गोदावरी खोऱ्यात १९६ टीएमसी पाणी उपलब्ध होते. त्यापैकी ११५ टीएमसी ऊर्ध्व भागासाठी, तर ८१ टीएमसी पाणी जायकवाडीस...

प्राध्यापक भरतीची व्यथा

                  डॉ.पाटील /लातूर' या नावाने  मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असलेल्या मित्राचा आज फोन आला होता.  तो सांगत होता, "सर, प्राध्यापक भरती MPSC द्वारे होण्यासाठी काय करावे सुचत नाही, संस्थाचालक 50 लाख रुपये मागतायेत जॉयनिंगसाठी, शेतही जास्त नाही विकून म्हडे शिकले असते त्यांचे.  नोकरी नाही म्हणून लग्नही जमेना. मायच्यान  सांगतो सर, 41 वर्षे वय आहे माझे,   शेकड्यांनी मुली पाहिल्या ; पण कुणी होकार दिला नाही. चार पोते तरी पोहे खाऊ घातले असतील आलेल्या पाहुण्यांना , आणि साड्यांचे तर विचारूच नका ; दुकानदार केस करायला निघाला होता उधारीसाठी, पण आईने मंगळसूत्र आणि घरातलं किडुकमिडुक विकून थोडी उधारी मिटवली, तव्हा गप्प बसला दुकानदार, पण देणं आहेच त्याचं. " मी सहज विचारले विषय कोणता आहे तुमचा आणि CHB का करत नाहीत मग एखाद्या कॉलेजवर? डॉ. सांगू लागले, "ऑक्सफर्ड शिकून आलेल्या प्राध्यापकाकडे अर्थशास्त्र पीच.डी.झाली माझी. आणि केली सर CHB 4-5 कॉलेजवर. सुरुवातीला काही ठिकाणी फुकट शिकवले आणि नंतर काही ठिकाणी पगारावर जॉईन झालो त...

मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी

मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी                    आजच्या घडीला शिक्षणाची डिग्री केवळ कागद ठरत असताना फक्त पारंपरिक शिकून उपयोग नाही. काळ बदलत आहे. एक काळ असाही होता की,   केवळ डी.एड./बी.एड. केले तरी सहज शिक्षक होता येत   असे आणि दहावी/बारावी पास झाले की, किमान मिलिटरीत / पोलिसात भरती होता येत असे. आज मात्र सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अगदी नेट/सेट/पीएच.डी. केली तरी नोकरी मिळत नाही. काही उच्च विद्याविभूषित तरुण वेठबिगारीची कामे करताना दिसून येतात, तर काही सीएचबीवर नोकरी करून पाच-सात हजारांत घर-संसार चालवण्याच्या फुटकळ प्रयत्न करताना दिसतात. डी.एड./बी.एड., नेट/सेट/पीएच.डी. करूनही आज नोकरी मिळविण्यासाठी पस्तीस ते पन्नास लाख रुपये डोनेशन भरावे लागते, हे काळे सत्य नाकारून चालणार नाही. एकीकडे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो   पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे छाती ठोकून सांगणारा आपला समाज शिक्षणामुळेच जीवनलढा हरतोय की काय, अशी शंका निर्माण होत आहे. साधी गोष्ट आहे साधा वडापाव विकणारा आपली मुले लाखभर डोनेश...